Friday 1 January 2021

New year 2021

परत एक नविन वर्ष सुरुवात होणार....अगदी दरवर्षी होत तसच . पण या वर्षात आणि ईतर नविन वर्षात खुप फरक आहे. काय काय पहायला मिळाल, कित्येक अनुभव आले. बरच शिकायला भेटल. एक नविनच आयुष्य भेटल्यासारख वाटलं. नविन वर्ष साजरं तर दरवर्षी करतो पण या वर्षी अस काय नविन....मलाच काय पण अपल्यापैकी कित्येकांना वाटल असेल, निदान एकदा तरी की आपण 2021 पाहू की नाही....हो ना? मलाही वाटल होत. त्यावेळीची अनिश्चीतता नक्किच अस्वस्थ करणारी होती पण त्यामधे एक चांगली गोष्ट झाली, आपण ज्या rat रेस मधे धावतोय त्याला कुठेतरी ब्रेक लागला, आयुष्यात थोड्या काळापूरते का असेना पण अपल्या priorities ची आपल्याला जाणीव झाली. काय हव होत तेव्हा माहितीये? हवं होत एक आयुष्य ....जरा अजुन वेळ ....स्वतःसाठी आणि जे आपल्याला जीव लावतात त्यांच्यासोबत अजुन जगण्यासाठी...तेव्हा कळल आयुष्यात ज्या गोष्टीना मुळात urgent समजायचो त्या तेवढ्या urgent नव्हत्याच. बस्स सगळे पळतायत म्हणूण आपण पळतोय. 
पण काही विसरत होतो नक्किच, जे आपले आहेत...आपल्यासाठी आहेत त्यांच्यासाठीच आपल्याला वेळ नव्हता. जेव्हा पण हा covid-19 जगातुन जाईल, सगळ पुर्वपदावर येइल,परत तिच धावपळ 2021 मधे सुरु होईल. पण जी शिकवण आपल्याला 2020 न दिली , ती घेऊन आपल्याला पुढे जायचयं....ज्या गोष्टि आपण lockdown मधे ठरवल्या ,त्या आपण करायच्या आहेत.....पुर्ण करताना काही गोष्टिंची जाणीव ठेवण गरजेच वाटत. हा नववर्ष संकल्प मुळीच नाही ...एक मात्र नक्की....की यावर्षी एक चांगली व्यक्ती म्हणून पुढे यायच.
तुम्ही कितिही चांगले असा, सुधारण्यासाठी वाव असतोच. Rat रेस मधे पळण्या आधी स्वतःला एक प्रश्न विचारायचा...तो प्रश्न म्हणजे.....का पळतोय ? मला वाटत गरजा कधीच संपणार नाहीत ,  स्वप्न कधीच  पुर्ण होत नसतात करण पुर्ण झालेल्या स्वप्नांची जागा नवीन स्वप्न घेत असतात. गरजांच्या अणि स्वप्नांच्या मागे धावताना मनाच समाधान मागे पडू नये....बस एवढी कळजी घ्यायची. लोक काय म्हणतील हा विचार मनातून काढून टाकायचा. जे मनात येइल तस वागायचं. खळखळून हसायच. मनात आहे ते व्यक्त व्हायच. कुठलीही अढी न ठेवता प्रेम करायच. जे खरच जीव लावतात त्यांना कधीच मागे नाही सोडायच कारण आयुष्य आहे तर पुर्ण जगायचं. कोणितरी बोललेल आपल्याला आयुष्य एकदाच भेटत...नाही...आपल्याला आयुष्य रोज भेटत....फक्त त्यात जीव (रस) नसतो. जे घासपीट  करुन आयुष्य जगतात त्यांच्या आयुष्यात काही नाविन्य नसतं. ते जिवंत तर असतात पण जगतात मेल्यासारख .
रोज मरण्यापेक्षा चला थोड जगुयात. शेवटी एक श्वासाच तर अंतर आहे जिवन आणि मरणात.....फिर फिक्र करके हररोज क्यों मरे.

Let's start again...😀
Begin again
There is always good time to start everything new...✌️✌️
Dear 2020, thank you for new lessons.....
Dear 2021,welcome..

Happy New Year.....💥💥

आपलाच 
- गुरु बारगजे

Friday 6 November 2020

BOOK 13: शक्ती, युक्ती व बुध्दी द्वारे समस्यांना विकासाची शिडी बनवण्याचा मंत्र - प्रतिसाद

पुस्तकाचे नाव: शक्ती, युक्ती व बुध्दी द्वारे समस्यांना विकासाची शिडी बनवण्याचा मंत्र - प्रतिसाद
लेखक: मनोज अंबिके
प्रकाशन: mymirror publishing house
 
साधारणतः रात्री ०१ वाजता हे पुस्तकं हाती घेतलं. झोप येत नव्हती. विचार केला की एखादं पुस्तक वाचायला घेऊ तर आपोआप झोप लागेल. पहिले ५-१० पाने वाचली आणि उत्कटता वाडत गेली. पुढे काय होणार हे वाचण्याच्या नादात वेळ कशी निघून गेली कळलं पण नाही. सलग बसून एका बैठकीत वाचून  काडलं. सरासरी ८ तास लागले असतील. पण पुस्तकाची किमया अशी की सोडावं वाटलं नाही.
गोष्ट आहे. आदित्य ची. आदित्य, एक मुलगा ज्याचं पूर्ण बालपण हॉस्टेल मध्ये गेलं. आई वडील नाही. कुठून आला काही पत्ता नाही. त्याचा MBA होतं. त्याला वाटत की एखाद्या corporate company मध्ये काम करावं. पण कदाचित त्याची वाट वेगळी होती. परीक्षेच्या शेवटच्या दिवशी त्याच्या आयुष्यात एक वेगळं वळण येत. ज्या संस्थे मार्फत त्याच शिक्षण होत होत त्या शाळेतून त्याला बोलवण येतं. त्यानंतर त्याच्या आयुष्यात सगळं काही अनपेक्षित अस घडत जातं. ज्या संस्थेमुळे त्याचं पूर्ण शिक्षण झालेलं असतं त्याच संस्थे चा पूर्ण कारभार याच्या खांद्यावर येऊन पडतो. त्याच्या साठी आयुष्यात येणारी प्रत्येक गोष्ट शॉक असते. त्याला काय करावं सुचत नाही. सगळं काही नवीन असतं. येणारा प्रत्येक दिवस एक नवीन समस्या घेऊन येत असतो. पण अश्या स्थितीत सुद्धा तो परिस्थिती हाताळतो. 
या प्रवासामध्ये त्याच्या समोर जे अडथळे येतात तो कसा मात करतो हे वाचण्यासारखं आहे. त्याच्या मनाची घालमेल. त्याला झालेलं विरोध. संस्थे मधील विरोधी जाणारे लोक, पाठिंबा देणारे लोक, मानसिक आधार देणारे गुरुजी या सगळ्याचं वर्णन असं आहे की डोळ्या समोर चित्र उभारल्या सारखं वाटत. 
गुरुजी आणि आदित्य मधल संभाषण वाचताना मन आध्यात्मिक व्हायला होत. कुठतरी आपल्यात पण सकारात्मक ऊर्जा आल्यासारखं वाटायला लागतं.
तो ह्या सगळ्या गोष्टीना कसा तोंड देतो हे पाहण्या सारखं आहे. आयुष्या मध्ये येणाऱ्या समस्यांना श्री प्रभू रामचद्रांचे दास हनुमानाचे गुण कसे लागू पडतात हे वाचनीय आहे. 
मला वाटतं ज्यांना फक्त प्रॉब्लेम दिसत राहतात त्यांना हे पुस्तक आधी वाचायला पाहिजे. कदाचित याने आपला प्रॉब्लेम कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकेल. तशी सुरेख मांडणी आहे 
पुस्तकाची.
पुस्तकातील काही संवाद तर मनाला स्पर्श करून जातात. एके ठिकाणी गुरुजी म्हणतात,
" ज्याने संकट दिलं, समस्या दिली तोच समाधान पण देत असतो. फक्त जिथं संकट आहेत, समस्या आहेत तिथं जाऊन थांब. ज्या वेळेस तुम्ही समस्येपासून लांब पळता, उत्तर पण तुमच्या कडून लांब जात. संकटाच्या, समस्येच्या डोक्यावर जाऊन बस. जेव्हा तू संकटाच्या, समस्येच्या डोक्यावर जाऊन बसतोस , तेव्हा तुला तिथच उत्तर सापडतं. या जगात अस कुठलाही संकट नाही, समस्या नाही की ज्यात समाधान नाही. फक्त आपण संकटापासून लांब पाळायचा प्रयत्न करतो. म्हणूनच समाधान समोर असून सुध्धा आपल्याला दिसत नाही."
अजुन एक ठिकाणी ते म्हणतात,
" प्रत्येक घटनेमागे काहीतरी उद्दिष्ट असतं. उद्देश असतो. आपल्याला खूप वेळेला तो उद्देश कळत नाही. आपल्याला ती समस्या वाटते. आपल्याला ते संकट वाटतं. समस्यांचा, संकटांचा अर्थ सुरुवातीला कळत नाही. पण जसं- जसं आपण पुढे जातो तसं आपल्याला समजतं की त्या अडचणी नव्हत्याच. या आपल्या मदातीकरिता आल्या होत्या. हा दृष्टिकोन नसल्या मुळे गफलत होते."

मानवी मनाच्या काही कडा व्यक्त करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत अस वाटत. मानवी स्वभाव छटा दाखवल्या आहेत. हनुमानाचे प्रतीक वापरून समस्या च उत्तर पण सांगितलं आहे.
मला तर हे पुस्तक फार आवडलं आणि मला खात्री आहे की तुम्हाला सुधा हे पुस्तकं नक्कीच आवडेल. तुम्ही वाचल्या नंतर नक्की प्रतिक्रिया द्या. तुमच्या प्रतिसादाची आतुरता राहील. धन्यवाद.
आपला, 
गुरु बारगजे
www.gurusreads.blogspot.com

Tuesday 30 June 2020

चीनी अॅप बॅन च्या निमित्ताने

काल दि‌. २९ जुन, २०२० ला भारत सरकारने ५९ चीनी अॅप ला बॅन केले. जेव्हा हा निर्णय घेण्यात आला तेव्हा बऱ्याच समाजमाध्यमावर एक प्रश्न फिरत होता. बॅन योग्य कि अयोग्य? मला वाटतं प्रश्न असा असायला हवा होता. अॅप बॅन केल्याचा आपला फायदा काय?
तर मित्रांनो आपण २०१९ मध्ये जाऊ. तेव्हा काही कालावधीसाठी tiktok app बॅन करण्यात आलं होतं. तेव्हा tik tok ची कंपनी Bytedance ने कोर्ट फाईलिंग मध्ये असं सांगितलं कि त्यांचं प्रतिदिवस $५००००० चं नुकसान होत आहे. जे भारतीय रुपयात होतं ₹ ३ कोटि ८० लाख!!!!
वर्षाचे सरासरी ₹१३-१४ अब्ज रुपये!!!!!!
हि फक्त tik tok ची कमाई भारतातील ग्राहकांकडून. त्यांचे ३०% ग्राहक भारतीय आहेत. असे बरेच चीनी अॅप आहेत. तर त्यांना आपण किती पैसे पुरवतोय याची कल्पना करा.
कदाचित काहि लोक प्रश्न करतील , तुम्हाला काय अडचण? सांगतो.
Tiktok, club factory, uc browser etc..या सारख्या अॅप चे केवळ भारतातच ५० कोटी वापरकर्ते आहेत. त्यातील एकट्या tiktok चे १० कोटी. गोष्ट इथे संपत नाही. भारतीय ग्राहकांनी २०१९ मध्ये ५५० कोटी तास tiktok वर घालवलेत!!!! यावरून एवढा अंदाज लागेल कि तरुण पिढी चा किती वेळ यात जातोय. वरवर पाहिलं तर नुकसान काय?
१) आपन त्यांना पैसे कमवून देतोय. कोणाला? चीन ला. जो आपला मित्र राष्ट्र नाहि.
२) आपल्या तरूण पिढी चा अमुल्य वेळ वाया जातोय. भारत हा तरुणांचा देश आहे. हि तरुण शक्ति योग्य कामात लावली तर बदल घडवून आणू शकते.
३) कुठेतरी असं नाही वाटत का कि या आभासी दुनियेमध्ये जगताना आपण आपल्या खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतोय. आपल्या आजूबाजूला व आयुष्यात काय घडतंय किती लोकांना जाणिव असते.
Tik tok ने बऱ्याच लोकांना पैसे कमवून दिले असा एक युक्तिवाद केला जातो. पण त्याचं प्रमाण काय? ह्या उत्पन्नाच्या स्रोत पुर्ण निर्भर राहणं किती योग्य आहे?
१ .५ GB संपवण्यात आपलं भविष्य तर संपत नाहिये ना? याचापन कुठेतरी विचार व्हायला हवा.
आज आपल्या सरकारने हे अॅप बॅन केले. उद्या याची जागा कोणतं ना कोणतं अॅप घेईलच. प्रश्र्न हा कि आपल्या प्राथमिकता काय? आपला प्राधान्यक्रम काय असला पाहिजे?
मला एवढंच म्हणायचंय कि आपली प्राथमिकता, प्राधान्यक्रम ओळखा. बाजारात tik tok सारखे खुप प्रोडक्ट येतील. विकणं त्यांच काम आहे. पण आपल्या साठी योग्य काय हे आपण ठरवायला हवं.
पटतंय ना? नक्की सांगा.
- गुरू बारगजे
www.gurusreads.blogspot.com
www.gurudasbargaje.blogspot.com

Wednesday 24 June 2020

India- China trade

Present condition of INDIA-CHINA trade..this is huge trade gap..this has to be narrowed.
Second point is Chinese investment in indian start ups. Chinese have been heavily invested in these start up.. though brand are indian, major stakeholder is china..
Govt need to support such ambitious start ups so that Chinese presence should be reduced. 
This is high time. This is the time govt and citizens should modify habits so as to combat  Chinese influence.
#JaiHind
Ref: The hindu 24/06/2020

Sunday 29 March 2020

book 12: गोफ जन्मांतरीचे : अस्तित्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे

पुस्तकाचे नाव: गोफ जन्मांतरीचे:अस्तित्वाच्या प्रश्नांना  विज्ञानाची उत्तरे 
लेखिका: डॉ सुलभा ब्रम्हनाळकर
प्रकाशन: राजहंस प्रकाशन

ज्या व्यक्तीस प्रश्न पडत नाहीत, ज्या व्यक्ती निसर्गातल्या घटना पाहून अचंबित होत नाहीत, ज्या व्यक्तीच्या आयुष्यात चिकित्सा, कुतूहल, जिज्ञासा इ. दिसून येत नाही. ती व्यक्ती आयुष्यात फार पुढे जाऊ शकत नाही. जी व्यक्ती एखाद्या प्रश्नाच्या मागे लागते, त्याच व्यक्तीला त्या विषयाच सखोल ज्ञान मिळतं आणि प्रगती होते. जर कुतूहलच नसेल तर आपल्यात आणि इतर प्राणीमात्रांत फरक तो काय?
आता साधं उदाहरण घ्या; आपण जन्माला आलो म्हणजे नक्की काय घडलं? फुलं का उमलतात? झाड व प्राण्यांमधे एवढी विविधता कशी आहे? त्यांच्यात अन् आपल्यात एवढा फरक कसा? आपण म्हातारे का होतो? आपण का मरतो? असे असंख्य  प्रश्न आपल्या मनात असतात. त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला माहीत असतात. आणि ज्याची उत्तरे आपल्याला ठाऊक  नसतात त्याची उत्तरे आपण एका अज्ञात गोष्टीवर ढकलतो आणि त्यालाच समाज आणि जग 'देव' म्हणतो. अमुक ही गोष्ट कोणी केली तर देवानं केली असं एक ठळक उत्तर ठरलेलंच असतं. पण प्रत्येक गोष्ट ही देव आणि दैवावर ढकलून कसं चालेल? नाही ना, मग काय करायचं? प्रश्नांच्या मागे लागायचं , विज्ञानाच्या मार्गानं. जसेजसे आपण प्रश्न सोडऊ लागतो तसेतसे आपण निसर्गाच्या समोर नतमस्तक होतो. पण हा जाणून घेण्याचा प्रवास खूप मनोरंजक आहे बरं का. आणि हो, आपलं जगणं जे आरामदायी अन् सुसह्य जे झालंय ते याच जिज्ञासेमुळे.....
असो..आता आपण पुस्तकाकडे वळूया.
तसं वैज्ञानिक संकल्पना मराठीमध्ये व तेही सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत मांडणं सोप्पं नाही. पण ते लेखिकेने अतिशय समर्पक पद्धतीने केले आहे. पुस्तकाची मांडणी तीन भागात केली आहे.
1. जीवसृष्टीचे रहस्य 
2. उत्क्रांती
3. मानवी जग
जीवसृष्टीचे रहस्य काहीसे उलगडलेले, काहीसे तसेचं.पण एक मात्र नक्की, विज्ञानाच्या वाटेवर हे रहस्य एक दिवस उलगडेल. 'जीवसृष्टीचे रहस्य' यामधे काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती भेटते. जसं की डीएनए, जीनोम, उत्पत्ती-वाढ-लय , पंचभुतांचे शरिरात रूपांतर, पेशीविभाजन,आपण का मरतो ? इ. 
दुसरा भाग आहे "उत्क्रांती". उत्क्रांत म्हणजे 
 बदल. त्यामध्ये पहिला जीव उत्क्रांत कसा झाला? पहिला जीव आजच्या जीवापेक्षा काहिसा वेगळा होता. त्या मध्ये बदल होत होत आजचा जीव तयार झाला. तो कसा झाला असावा या बद्दल "रिंग स्पेसिज" च्या माध्यमातून लेखिकेने अगदी छान समजावून सांगितले आहे. त्याच्याही पुढे जाऊन आदिजीव ते माणूस हा प्रवास कसा झाला या बद्दल माहिती आहे. त्यात केंद्र नसलेली पेशी ( prokaryot) आणि केंद्र असलेली पेशी (Eukaryot) या बद्दल सांगितलं आहे. याच एकपेशीय जीवांपासुन उत्क्रांत होत होत आजची दैदीप्यमान, वैविध्यपूर्ण सजीवसृष्टी निर्माण झालीय. त्यात जीवजंतू इ. पासुन वनस्पती, प्राणी, अमिबा,स्पंज, ctenophore, निडारिन (cnidarian) , पट्टकृमी ( flatworms), मृदुकाय (mollusc), संधिपाद ( arthopoda), मुंगी, मधमाशी, पृष्टवंशीय प्राणी (chodates), मासे, उभयचर (ambhibian) ,सरिसृप( sauropsids), सस्तन प्राणी ( mammals), शिशुधानी प्राणी(  morsupials), गाभणी सस्तन प्राणी ( placetal mammals) इ.इ. येतात.
माणुस गाभणी सस्तन प्राण्यांच्या गटात मोडतो.
उत्क्रांतसाठी तीन फार महत्त्वाच्या गोष्टी असतात.
१) सहकार्य
२) सहउत्क्रांती
३) स्पर्धा
जर जगायचं असेल, जीवसृष्टीत टिकायचं असेल तर यापैकी एक मार्ग निवडावाच लागतो. याच विभागात शरीर नावाचं यंत्र कसं कसं घडत गेलं त्याबद्दल चा ऊहापोहा आहे.
तिसरा विभाग आहे आपला. अर्थात मानवी जगाचा. यामध्ये आणखी काही प्रश्न वाढवून ठेवले आहेत. जसं की, जर सगळंच निसर्गाच्या अधीन आहे तर आपण इतका मुक्त विचार कसा करू शकतोत?  जर गुणवैशिष्ट्ये DNA
वर ठरत असतील तर मुल्य, संस्कार, विचारधारा यांना इतकं महत्व का आहे? काहि गोष्टि आपल्याकडुन नकळत कशा घडतात? 
यांतील बहुतेक प्रश्र्नांचं समाधान लेखिकेने या पुस्तकाच्या माध्यमातून केलेलं दिसुन येते. काही काही गोष्टी वाचताना मन बधिर होऊन जातं. पण तरीही हा जीवसृष्टीचा प्रवास खुप रंजक आहे. ज्यांना या प्रश्र्नांची उत्तरे  हवीत त्या व्यक्तिंनी या पुस्तकात नजर टाकायला हवी असे मला वाटते.
यातील काही गोष्टींबद्दल आपन नंतर याच ब्लाॅग वर नक्कीच बोलुयात.
धन्यवाद!!!
आपला,
गुरु बारगजे
www.gurusreads.blogspot.com

Saturday 29 February 2020

Book 11: बलुतं

पुस्तकाचं नाव: बलुतं
लेखक: दया पवार
प्रकाशन: ग्रंथाली प्रकाशन
बलुतं

बलुतं...कसलं? धान्याचं.. कदाचित समाज व्यवस्थेचं आणि जाती व्यवस्थेचं सुद्धा...
हि कसली व्यवस्था जिथं मानसाला कामावरून नाही तर आडनावावरून judge केलं जातं.  
बलुतं तसं तर एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून पाहिलं जाऊ शकतं पण आपल्या आजूबाजूला काय दिसतं. स्वातंत्र्यास ७० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला तरी जातीव्यवस्था नष्ट होण्याचा संभव दिसत नाही. कारण काय असावं?
हि कथा हि आहे दगडू मारुती पवार यांची. भुतकाळातला दगडु भविष्यकाळात दया होतो. दगडु नं दया ला सांगितलेली कथा..बलुतं...
कायद्याचा धाक असेल किंवा समाजाचे वैचारिक परिवर्तन झालेले असेल..कारण काहिहि असो..पण आता बराच फरक पडतो आहे.
बलुतं मध्ये तत्कालीन समाजव्यवस्थेचं प्रतिबिंब दिसतं. जिथं जातीनुसार कामाची वाटणी आहे. आडनावावरून जात ठरवली जाते. जातीवरून मंदिर प्रवेश नाकारला जातो. सार्वजनिक विहिरीवर पाणी भेटत नाही. वारिक यांच्या डोक्याला हात लावत नाही. या आणि अशा अनेक गोष्टी.
हे सगळं वाचताना मन विषन्न होतं. राग येतो. 
यातील एका प्रसंगात लेखक लिहितात.

"शहरात केस जरी सर्रास कापले जायचे, तरी गावी मात्र गावचा न्हावी बराच काळ महार-चांभारांचे केस कापायचा नाही. वाटायचं खुषाल म्हशी भादरतो, पन म्हशीपेक्षाहि आमची किंमत जादा नसावी ना? आपलं गावचं गिऱ्हाईक तुटेल ह्या भितीनंच आमच्या वस्तीतील कुणाला तो स्पर्श करित नसावा."

हा उतारा वाचल्यानंतर त्यातील गंभिरता लक्षात येते. म्हणजे जिथं म्हशी मानसापेक्षा उच्च दर्जाच्या समजल्या जातात तिथं न्यायाची आणि समानतेची मागणी कुठुन करायची.

दुसऱ्या एका प्रसंगात लेखक लिहितात कि महार व इतर जातींतील व्यक्तींसाठि वेगवेगळ्या विहिरी असायच्या. इतर जातींतील व्यक्तींसाठिच्या विहिरीवर महारांना पाणी भेटत नसायचं. अगदिच निकड असेल तर भांडे घेऊन विहिरीवर जायचं. कोणाला दया आली तर ती व्यक्ती महाराच्या भांड्यात पाणी टाकायची. अशी एखादी पन व्यक्ती नाही भेटली तर तासनतास विहिरीवर बसुन राहावं लागायचं.

कामाच्या बाबतीत पन तसंच. अगदिच निकृष्ट दर्जाचे काम तथाकथित खालच्या जातीतील लोकांना भेटायचं.
उच्च-निच हा प्रकार तर इतका भयानक कि पोटजातीतहि भेदाभेद चालायचां. हे सगळं वाचताना मन विषन्न होतं.
आणखी एक प्रसंग असा कि, जागा महारांची, कष्ट करणारे पन महारच, मंदिर उभं करताना पन महारच कामाला..पन जेव्हा मंदिर बांधले जाते तेव्हा त्याच महार लोकांना प्रवेश नाकारला जातो. कारण काय? *जात*
म्हणजे हि तर सरळसरळ विषमता. पन दुर्दव असं कि त्यांना गुलामीची जाणीव नव्हती. 
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे,
" गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते पेटुन उठतील."
मग ती जाणीव शिक्षणाने सुद्धा येते. पण शिक्षणाचा अभाव असल्याने जे जसे आहे तसे स्विकारण्यातच धन्यता मानली जायची.

या आणि अशा बऱ्याच गोष्टी या पुस्तकात भेटतील. भाषा गावाकडची आहे. फार रंगवून सांगतल्या सारखं वाटत नाही. जे जसे आहे तसे लिहिलंय असं वाटतं. काही ठिकाणी वैचारिक मंथन पन दिसुन येतं.दगडु च्या मनात चाललेलं वादळ दिसतं. दगडु च्या आई चा संघर्ष दिसतो. राजकारणात उतरलेली पिढी दिसते. व्यसनाधीनता दिसते. जिथं न्यायाची अपेक्षा करावी अशा व्यक्तिकडुन झालेला विश्वासघात हि दिसतो. एकंदर समाजव्यवस्था ढवळून निघालेली दिसते.
तसं पुस्तकात बरंच काही चांगलं-वाईट आहे पण एक गोष्ट मात्र मला खटकली. ती गोष्ट अशी कि पुस्तकात एकसंधपणा दिसत नाही. असं वाटतं की लेखकास जसं जसं आठवलं तसं तसं लिहिलंय. पन एक मात्र नक्की पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाचं  दडलेले दुःख बाहेर पडतय असं वाटतं.
सगळ्यात प्रकर्षानं एक वाक्य आहे जे नं विसरण्यासारखं आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच ते लिहितात,
" या पुस्तकातील काही भाग जर काल्पनिक वाटला तर तो केवळ योगायोग समजावा".
कदाचित अशा सुरूवातीची कोणी अपेक्षा केली नसणार.
असो. हा माझा अभिप्राय झाला. आपणास हे पुस्तक कसं वाटलं. नक्की कळवा.

आपला,
 Guru Bargaje
www.gurusreads.blogspot.com

Monday 27 January 2020

Let's learn about: DNA

D.N.A. 🧬

DEOXYRIBONUCLEIC ACID is long molecule that contains our unique genetic code like a recipe book that consist of instructions about how to make proteins of the body.
DNA made of molecules called nucleotides. Each nucleotide contains phosphate group, a suger group and a nitrogen group. Four type of nitrogen group bases are
1) Adenin (A)
2) Thymin (T)
3) Guanin (G)
4)Cytosin (C)

Adenin (A) always makes bond with Thymin (T) Which is double hydrogen bond. And Guanin (G) always makes bond with Cytosin (C) which is triple hydrogen bond.

The order of these bases is what determines DNA's instructions (or) genetic code.

Out of four bases any combination of three bases makes a codon. A proper sequential combination of codon makes amino acids. There are approx 20 amino acids. These amino acids are building blocks of proteins.


DNA is two stranded molecule as shown in picture above. It has a unique "double helix" shape, like a twisted ladder. These strands are separated during DNA replication. This double helix structure was first discovered by Francis crick and James Watson with the help of Rosalind Franklin's and Maurice Wilkins. 

fig.watson and crick with DNA model


Watson,crick and Wilkins got Nobel price in 1962 for this discovery.

Why DNA IS SO IMPORTANT ?
DNA is vital for all living beings even plants . It is important for inheritance, coding for proteins and genetic instructions guide for life and it's processes. DNA holds the instructions for an organisms or each cells development and reproduction and ultimately death.
DNA carries code for proteins. However, the actual protein differs from the code present in the DNA.

The basic steps are:
1) transcription
2) translation
3)Modifications and folding

DNA info is copied and transmitted by RNA. RNA acts as messenger to carry info to other cells. Then ribosomes comes into play. They act as translators by translating the messenger code into proper protein format or chain of amino acids that forms building blocks of proteins. Each amino acid is formed by combining three bases of the RNA.
After that it is sent to required areas of the body.

DNA Replication:
DNA is important in terms of heredity. It has all the genetic information which is gets passed to next generation. Because DNA makes genes and genes makes chromosomes.
fig. 23 pairs of chromosomes

Human have 23 pairs of chromosomes. This total of 46 chromosomes. Twenty two of their pair called as autosomes that looks same in both male and female. 23 rd pair is called as sex chromosome which is different for both male and female. Female have two copies of X chromosomes or XX, while males have one X and one Y chromosomes or XY. 
Sperm and egg contains half number of chromosomes i.e. 23 each. When egg and sperm fertilizes , this gives rise to cell that has complete set of chromosomes.

( Note: This info is for general knowledge. I am not a medical student or related to medical field. if found some mistakes or corrections, please feel free to suggest correction/ ommissions/ additions etc. )

thanks for reading.

Your, 
Guru Bargaje
www.gurusreads.blogspot.com

Wednesday 1 January 2020

BOOK 10: तिमिरातून तेजाकडे-समग्र अंधश्रद्धा निर्मूलन व पुढे (भाग १)

BOOK 10: तिमिरातून तेजाकडे-समग्र अंधश्रद्धा निर्मूलन व पुढे
लेखक: डाॅ. नरेंद्र दाभोलकर
प्रकाषक: राजहंस प्रकाशन प्रा. लि.



माझ्या हाती पडलेलं डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांचं हे दुसरे पुस्तक. त्यांच्या " विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी" या पुस्तकाबद्दल मी यापूर्वी लिहिलेलं आहे.





डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांचं हे दुसरे पुस्तक प्रामुख्याने ३ भागात विभागले आहे. 
१) विचार
२) आचार
३) सिद्धांत
या पुस्तकाबद्दल मी दोन टप्प्यांत लिहिणार आहे.
डॉ नरेंद्र दाभोळकरांनी "विचार" मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, फलज्योतिष, वास्तुशास्त्र, संमोहन, भानामती, बुवाबाजी इ. विषयांवर अगदि परखड भूमिका मांडली आहे.
आपण त्याकडे थोडक्यात बघुया.
I) वैज्ञानिक दृष्टिकोन:
 कोणत्याही गोष्टीमागचा कार्यकारणभाव शोधने म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन. यासाठी फार मोठ्या तांत्रिक व्याख्येची गरज नाही.वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्यासाठि विज्ञान शाखेची पदवी लागते का? तर अजिबात नाही. आसपासचे जग काही नियमानुसार चालते. ते जाणून घेण्याचे कुतुहल असेल तरी पुरेसे आहे.
 वैज्ञानिक दृष्टिकोनात भारत मागे का?
- याची काही ढोबळ कारणे अशी:

१) बाबावाक्य प्रमानम-
अर्थात बाबाजी जे बोलतील तेच खरं. मग त्याची चिकित्सा तर दुरच राहिली, त्या बद्दल शब्द सुद्धा गुन्हा ठरवला जातो.

२) ज्ञानबंदि-
कित्येक शतके भारतात जातिव्यवस्था बळकट होती व आजही काही प्रमाणात ती अपवादाने का असेना पण दिसुन येते. पुर्वी हे खुप तीव्र असायचं.या जातीव्यवस्थेमध्ये तथाकथित अस्पृश्य जातीतील लोकांना ज्ञानसंपादनाची परवानगी नसायची. स्त्रियांना तर ज्ञानबंदि होतीच होती. आणि जे काही शिक्षण असायचं ते धार्मिक शिक्षण व आकडेवारी यापलीकडे कधी गेलच नाही. जिथे ज्ञानच नाही तिथं विज्ञान कुठुन येणार. वैज्ञानिक दृष्टिकोन तर शक्यच नाही.

3) शंका निरसन न होणे
लहान मुलांच्या मनात बऱ्याच गोष्टींना घेऊन कुतुहल असते. ते खुप प्रश्न विचारतात. अशा वेळी त्यांच्या शंकांचे निरसन होणे आवश्यक असते पण बहुतेक वेळा समाधान होण्यापेक्षा त्यांना गप्प बसण्यास सांगितले जाते. तिथेच त्यांच्या चिकित्सक वृत्तीला लगाम लावला जातो. मग लहानपणापासून असे संस्कार घेऊन मोठी झालेली व्यक्ती चिकित्सक असेल काय? वैज्ञानिक दृष्टिकोनासाठि व्यक्ती चिकित्सक असने गरजेचे आहे.

४) व्यक्तिंचे दैवतिकरण
जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला देवस्थानी बसवले कि आपण आपली पुर्ण विवेकबुद्धी तिथं गहाण ठेवली असं समजा. आपली श्रद्धा अशी होऊन जाते कि त्या व्यक्तीने काही हि केले किंवा सांगितले तर आपल्याला ते मान्यच असते.  काहि महाभाग तर इथपर्यंत पोहोचतात कि फक्त आमचे बाबा किती "खरे" आणि बाकीचे किती "भोंदू" आहेत. श्रद्धा असणं गैर नाही पण आपण कुणावर श्रद्धा ठेवतोय हे पाहणं पण गरजेचे आहे.

५) राजकीय अनास्था
काहि राजकीय नेत्यांना याची जाणीव असते कि आपल्या मुक-सहकार्यातून गैरप्रकार वाढु शकतात पण लोकक्षोभ नको म्हणुन कारवाई टाळली जाते.

II) फलज्योतिष शास्त्र (?)
कोणतीही बाब शास्त्र म्हणुन उतरण्यासाठी एक ग्रहितक मांडावे लागते. विज्ञानाच्या कसोटीवर ते तपासून सिद्ध झाले तर त्यास शास्त्र आहे असे संबोधले जाते.
फलज्योतिषाचा सर्व व्यवहार ज्या मांडणीवर उभा आहे ते ग्रहितक असे.-
१) आकाशस्थ ग्रहगोलांचा परिणाम मानवी जीवनावर सतत होत असतो.
२) मानसाच्या जन्मवेळेवर तो अवलंबून असतो.
३) त्यामुळे व्यक्तीचे भविष्य ठरते किंवा जे ठरलेले आहे ते कळते आणि बदलतेहि.

याच आधारावर सर्व फलज्योतिषाचा पसारा उभा आहे. आता यातील पोकळपणा पाहु.
एक तर आकाशातील कोट्यावधी ग्रहताऱ्यांपैकी काही मोजक्या ताऱ्यांना कुंडलीत स्थान आहे. बाकीच्या ग्रहताऱ्यांना काडीची किंमत नाही. 
कुंडलीत आढळणारे ग्रह म्हणजे सुर्य, चंद्र,मंगळ,बुध, गुरु,शुक्र,शनी,राहु व केतु. सुर्यमालिकेतील युरेनस, नेपच्यून व प्लुटो हे ग्रह १५० वर्षांपूर्वी कुंडलीत नव्हतेच, कारण त्यांचा शोध लागला नसल्यामुळे ज्योतिशांना ते ठाऊक नव्हते.बर तेहि जाऊ द्या. कुंडलीतील कथित नवग्रहाची स्थिती काय आहे? यांपैकी सुर्य हा तारा आहे. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. राहु , केतु नावाचे ग्रह तर अस्तित्वात च नाहीत. चंद्र या उपग्रहाला जर कुंडलीत स्थान आहे तर इतर उपग्रहांना पण असायला हवे. पण तसेही आढळत नाही. 
व्यवस्थित विचार केला तर हा सगळा गडबड घोटाळा लक्षात येतो.

III) वास्तुशास्त्र
खरेतर या गोष्टीची चर्चा होण्याची गरज नाही पण तरीही ती चर्चा करावी लागते हेच मुळात चुकीचे वाटते. स्वतःचे घर असणं हा एक जिव्हाळ्याचा विषय आहे.मग ते घर लाभावं अशी मनस्वी इच्छा असते. घर लाभत म्हणजे काय तर भरभराट व्हावी , बढती मिळावी, धंद्यात फायदा व्हावा इ. पण त्या मागचे कारण न शोधता वास्तु च खराब आहे असं ग्रहित धरल जातं. मग ती वास्तु शांती (?) केली जाते. खरच याला काही कार्यकारणभाव आहे का ? भरभराट होणे, बढती होणे यात तुम्ही केलेल्या कामाचे फळ असणार आहे, यात तुम्ही कोणत्या वास्तु मध्ये राहतात याला काडिची किंमत नाही.

IV) मन व मनाचे आजार
मुळात मन आजारी पडतं म्हणजे काय होतं हे लक्षात घेणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा असे लक्षात येते की एखाद्या व्यक्तीला वेड लागल्यासारखे होते, व्यक्ती असंबद्ध बडबड करते, कधी-कधी अंगात पण येते. इथं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ती व्यक्ती प्रत्येक वेळी नाटक करत नसते, ती त्या व्यक्तीची प्रामाणिक प्रतिक्रिया असु शकते. 
एक उदाहरण घेऊ. गावाकडे काही स्त्रियांच्या बाबतीत असं आहे की त्यांच्याकडे व्यवहार नसतो, त्यांच्या मताला कोणी किंमत देत नाही, घरात दुय्यम स्थान दिलं जातं. अशा वेळी त्यांच्या मनातील भावना व विचार त्या मनमोकळेपणाने व्यक्त करू शकत नाहीत. हे विचार असेच साचत जावून त्यांच्या मनावर ताण येऊन वरील प्रकार घडु शकतो. त्यातल्या त्यात ज्या व्यक्तीला कोणी विचारत नाही त्यांना अंगात देवी आल्यावर सगळे मान देतात. ज्या व्यक्तीला कोणी विचारत नसतं त्या व्यक्तीसाठी हि सुखद अनुभव असु शकतो. अशा वेळी त्या व्यक्तीस दोष देण्यापेक्षा समजून घेतलं तर ते अधिक प्रभावी होईल.

V) बुवाबाजी
बुवाबाजीचे पीक या भुमीत भरघोस येण्याचे कारण म्हणजे अति दैववाद व नशीब नावाच्या काल्पनिक गोष्टी वर अती विश्वास.
बुवाबाजीचे डॉ नरेंद्र दाभोळकरांनी २० मुख्य कारणे दिली आहेत. त्यातली काही अशी:
१) अगतिकता, अस्थिरता व अपराधीपणा
आजच्या जगात पुढच्या क्षणी काय होईल याची खात्री नाही. मला काही झालं तर काय याची काळजी नेहमी असते. येण्यऱ्या संकटातून माझे बाबा सुटका करतील अशी आशा भक्त करत असतो.
कधी-कधी केलेल्या चुकांना घेऊन एक अपराधीपणाची भावना मनात असते. बाबांना शरण गेलं म्हणजे आपले पाप धुतले जातील अशी आशा भक्तास असते.
२) अतृप्त कामना
सगळं काही मनासारखं व्हावं असं वाटणं
३) मानसिक आधार
४) आत्मा,परमात्मा,ब्रम्ह, परब्रह्म,मोक्ष, मुक्ती या शब्दांचे मायाजाल
५) अवतारवाद
६) सामाजिक प्रतिष्ठेचा लाभ इ.
७) चमत्कार
चमत्कारांना सत्य मानणे आणि कोणतीही शंका उपस्थित न करता चमत्कारांना शरण जाणे हे मानसिक गुलामगिरी चे लक्षण आहे.

यांपैकी बुवाबाजी या प्रक्रियेतून एकुणच जी मानसिक गुलामगिरी तयार होते, तिचे गांभीर्य सर्वाधिक आहे.

या ब्लाॅग पोष्ट मध्ये इतकंच. या पुस्तकाचे "आचार व सिद्धांत" आपण पुढिल पोष्ट मध्ये पाहु.
धन्यवाद.

आपला, 
गुरु बारगजे
www.gurusreads.blogspot.com



Thursday 14 November 2019

Book 9: The miracle morning..The 6 habits that will transform your life before 8AM

Book : The miracle morning..The 6 habits that will transform your life before 8AM
Author: Hal ELROD
Publisher: JOHN MURRAY LEARNING



Not all books deserve our valuable time but yes, few do. Even in that case too, one can not expect that every single page of that book will give knowledge or whatever you desire from it. May be same case with this book. when I started reading this book, I was eagarly waiting for the main content of the book. I kept on turning pages after pages of it, hoping that may be on another page I will find something.
After around 50 or some pages real books starts. Before that it's just a talk regarding book only. I think it is not so important to discuss about the book for 50 pages. A couple of pages are sufficient for introduction. But author kept on writing regarding people's reaction and experiences after reading the same book. I think this much of elaboration is not required.
Anyway let's come to book summary which is important for me and I suppose for you too.
This book explains about few rituals or practices that a person should adopt for healthy and peaceful life. As per author these rituals looks so ordinary but they have much greater impact on our life in a long term.
They have abbreviated as S.A.V.E.R.S.  by author. Let's have a look at it.
1) S- SILENCE
when ever we woke up we shouldn't do anything. Let our soul and body take its own time. Just observe things around you. Try not to think much. Just be silent.
Meditation may help in that matter.
2) A- AFFIRMATION
Telling yourself about what you want. What you want to be and what you would like to be. It doesn't matter how big or small your dreams are. What matters most is that they exist. For ex. If you want to be successful business man just say "I am a successful business man." At first sight it may ridiculous but actually it works. What happens is when you say such thing to yourself, you keep of reminding yourself about your dreams and aspirations. It works like a positive energy.
3) V- VISUALIZATION
This is next step of affirmation. Just saying is not enough,we should act in that direction so that we can achieve our intended goal. Every day we should visualize our dreams.
4) E- EXERCISE
Now comes very difficult task of our day to day life. There is always a reason for not going to gym or doing workout. Mostly two reasons are more predominant. First is, I don't have much time for workout. I am very busy. The second reason is , I am too much tired.
Most of us fall into these two reasons.
Exercise is really a very important thing. It has impact not only on body but on mind too. There is a connection between mind and body.
5) R-READING
"TWO THINGS MAKES PERSON WISE. PEOPLE WE MET AND THE BOOKS WE READ."
We may or may not have control over the formar but we can certainly choose later. We are free to choose books. No matter what you read. It is always beneficial as long as it feeds our brain and soul.
Investment in books is the best investment. The amount of knowledge you gain is beyond your imagination. Such a powerful book reading can be. 
You can choose from any type of literature. But one should read few pages everyday.
6) S- SCRIBE
Don't be confused. Scribe is just another word for writing. Now it does not matter what you write. It can be your personal diary, book notes, articles or whatever you interested in. Writing gives us a proper orientation to our thought process.
As per author these six S.A.V.E.R.S are very vital for any person who want to excel in his life.
A special thanks to EXECUTIVE ENGINEER MR.K.N RATHOD for suggesting me to read this book and he even gave a copy of it.
Well, this is all about "the miracle morning" by HAL ELROD.
Keep reading,keep growing.
Thanks,
Guru Bargaje
www.gurusreads.blogspot.com



Monday 21 October 2019

BOOK 8: अमृतवेल

पुस्तकाचे नाव: अमृतवेल
लेखक: वि.स.खांडेकर
प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस
प्रेम हे विद्युत जोडणी सारखं वाटतं कधी-कधी. म्हणजे बघा ना... व्यवस्थित जोडणी झाली तर प्रकाश.. अंधारास जाळणारा लख्ख असा प्रकाश.. पण तीच जोडणी चुकली तर..शाॅर्ट सर्किट..आग.. कधी न भरुन येणारं नुकसान सुद्धा. प्रेमाचं पन असच असतं ना. जोडणी योग्य झाली पाहिजे. नाही तर जीवन अंधकारमय व्हायला वेळ लागत नाही.
अमृतवेल वाचताना या गोष्टीची जाणीव पदोपदी होते.जर प्रेम निस्वार्थ भावनेने असेल तर ते बहरते पन त्याच प्रेमात स्वार्थ, अपेक्षा इ. आल्या कि प्रेम कंडिशनल होऊन जातं. मग छोटासा अपेक्षाभंग नात्यांची वाट लावुन टाकतो.
अमृतवेल हि अशीच एक गोष्ट आहे. यात प्रेम आहे,विरह आहे, अपेक्षा आहे आणि अपेक्षाभंग सुद्धा. यात एक आईचं मन आहे आणि तीच आई आहे जी नवऱ्याच्या दृष्टिने कुलटा आहे. नंदा नावाच्या मुली पासुन सुरू होऊन हि कथा एका वेगळ्याच वळणावर येऊन थांबते. नंदा, जीचा होनारा नवरा अपघातात मृत्यूमुखी पडतो. ती नंदा सैरभैर होते. मन रमवण्यासाठी म्हणुन ती तिच्या मैत्रिणीकडे (वसु) कडे जाते. वसु एक गरिब घरची व सुंदर असते. तीचे गायन पण अतिशय सुरेख असते. तीच्या रुपाला व गळ्याला मोहित होऊन एक जहागिरदार (देवदत्त) तीला मागणी घालतो. हि पण त्याच्या संपत्तीला भाळून होकार देते. वरकरणी सर्व काही सुरळीत वाटत असताना त्यांच्या नात्यात मात्र कमालीचा दुरावा जानवतो. वसुंधरा व तीची मुलगी मधुरा यांना देवदत्त राक्षसी वाटतो. तर देवदत्त स्वत:च्या वडिलांच्या मृत्यूसाठी आई ला जबाबदार धरतो व त्याचा स्वभाव विचित्र होतो. देवदत्त प्रचंड संपत्ती असुनही त्याचा उपभोग घेऊ शकत नाही. तो त्याच्या मनात एकाकी आहे.
पन त्या सर्वांना त्यांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर ते त्यांच्या ठिकाणी बरोबर वाटतात.
पुढे वसुंधरा चं काय होतं, वसुंधरा चे व देवदत्त चे नातं सुधारतं का, नंदा या परिस्थितीत कशी वागते, देवदत्त ची आई स्वत:ला कसं स्पष्ट करते या सगळ्या गोष्टी आपल्याला पुस्तकात बांधुन ठेवतात. पुस्तकातील शब्दसामर्थ्य असं कि काही क्षण का असेना आपण स्वत:ला विसरून जातो.
आपण जे असतो ते व आपण जे जगाला दाखवतो ते या दोन्ही मध्ये खुप अंतर असु शकते. मनाच्या दोन बाजू इथं पानोपानी जानवतात.
वि.स.खांडेकरांचे शब्दसामर्थ्य व प्रेम-विरहाची कथा यासाठी या पुस्तकात एक नजर टाकायला काही हरकत नाही असं मला वाटतं.
पुस्तक वाचल्यानंतर तुम्हास हे कसे वाटले ते नक्की कळवा.
सदैव तुमचा,
गुरू बारगजे
@www.Gurusreads.blogspot.com

New year 2021

परत एक नविन वर्ष सुरुवात होणार....अगदी दरवर्षी होत तसच . पण या वर्षात आणि ईतर नविन वर्षात खुप फरक आहे. काय काय पहायला मिळाल, कित्येक अनुभव आ...